Saturday, 6 July 2019

रानी की वाव - पाटण - गुजरात


     रानी की वाव

 दक्षिण भारतात समुद्राच्या सीमा ओलांडून चोल राजे आपला पराक्रम गाजवत होतेमहाराष्ट्रात यादवांचं राज्यं अत्यंत बळकट होतं त्याचवेळेला गुजरात मध्ये सोळंकी घराण्याचा विस्तार वाढत होताया घराण्यानी केलेल्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीमुळेसोळंकी साम्राज्याच्या सीमा सर्वदूर पसरण्यासाठी खूप मोठी मदत झालीयाच काळात भारतभरात विविध राजघराणी अनेक सुंदर सुंदर स्थापत्य उभी करत होती.  स्टेप-वेल (पायऱ्या असलेली विहीरअशी साधी वाटणारी  संकल्पना काळाच्या ओघात अत्यंत अवघड पण खूप सुंदर अशा स्थापत्य शैलीमध्ये परावर्तित झालेली दिसते.  धोलावीरा इथे झालेल्या उत्खननात अशा प्रकारचं स्थापत्य आपल्याला बघायला मिळतंपाण्याच्या साठ्यापर्यंत जाण्यासाठी केलेली मानवनिर्मित सोय या सुरवातीच्या कल्पनेपासून या स्थापत्याचा मंदिरापर्यंतचा प्रवास आपल्याला गुजरात मध्ये बघायला मिळतो.
राणी उदयनमती हिने सोळंकी राजा आणि पती भीमदेव (पहिलायाच्या स्मरणार्थ पाटण येथेसरस्वती नदीच्या  काठी  हे स्थापत्य घडवायचा निर्णय घेतलाअकराव्या शतकात तयार झालेली हि रानी की वाव १९६० सालापर्यंत संपूर्णपणे नदीच्या पाण्याने आणि गाळाने भरलेली होती आणि कदाचित म्हणूनच परकीय आक्रमकांच्या नजरेतून हे स्थापत्य वाचलेभारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन करून हे सांस्कृतिक वैभव आपल्या सर्वांसाठी मोकळे केलेयुनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या जागेचा समावेश होतो.
पूर्वाभिमुख रचना असलेले हे स्थापत्य ६० मीटर लांब२० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहेचार भागांमध्ये विभागले गेलेले हे स्थापत्य अत्यंत सुंदर अशा शिल्पांची अलंकृत आहेखांबांच्या आधाराने बाल्कनी करूनवेगवेगळ्या उंचीवर आणि वेगवेगळ्या आकारात हे विभाजन केले आहेयापैकी सर्वात खालचे दोन भाग हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले नुकसान आणि अतिउत्साही पर्यटक यामुळे बंद केले आहेतपूर्वेकडून या विहिरीत उतरायला पायऱ्या बांधल्या आहेत तर पश्चिमेची बाजू ही डोंगराच्या कड्यासारखी सरळ असून त्यावर शेषशायी विष्णू मूर्ती कोरल्या आहेत. 
रानी की वाव मध्ये विष्णू आणि विष्णूचे अवतारशिवदुर्गाभैरवसुरसुंदरीयोगिनी अशी अनेक शिल्पं कोरली आहेतयापैकी काहींचा परिचय इथे करून घेऊयात.
भैरव
शंकराच्या रौद्र रूपांपैकी एक म्हणून भैरव समजला जातोअनेक पुराणांमध्ये या संदर्भातल्या कथा आपल्याला वाचायला मिळतातया ठिकाणी असलेला भैरव हा १८ हातांचा आहेवरच्या दोन हातांमध्ये पकडलेला सापउजवीकडच्या हातांमध्ये असलेलं खङगडमरू आणि तिथेच खाली प्रेताचा हात खाणारा एक गण दिसतोडावीकडे खालच्या हातात केसांना धरलेलं डोकं आणि ते चाटणारं कुत्रं कोरलं आहेबीभत्स तरीही सुंदरअत्यंत बारकाईने कोरलेली केशरचनागळ्यातले दागिने आणि कमरेच्या वस्त्रावर कोरलेली नक्षी लक्ष वेधून घेते.




वराह
विष्णूच्या दशावतारांपैकी हा तिसरा अवतार मानला जातोया मूर्तीच्या स्थापनेमुळे राज्यप्राप्ती होते असे संदर्भ आपल्याला अग्नीपुराणात बघायला मिळतातहिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात लपवले आणि विष्णू वराहाच्या रूपाने प्रकट झालेत्या राक्षसाचा संहार केला आणि पृथ्वीला वाचवले अशी ही कथा आहेइथे असलेली मूर्ती ही शिल्पशास्त्राचे खूप सुंदर उदाहरण म्हणून बघता येईलकमळावर पाय ठेऊन उभा असलेलाशंखचक्र आणि गदा धारण केलेलात्यानं जीला वाचवलं ती पृथ्वी कोपऱ्यातून दुमडलेल्या त्याच्या हातावर बसलेली आहेअसा ताठ उभा असलेला हा वराह अत्यंत रुबाबदार दिसतोकमरेत खोचलेलं खंजीर आणि वस्त्रांवरचं नक्षीकाम कलाकारांनी खूप सुंदर केलं आहेया मूर्तीच्या बाजूला छोट्या छोट्या देवकोष्ठांमध्ये विष्णूची इतर रूपे कोरली आहेत. 







इंद्रनील सदानंद बंकापुरे
Indologist and Heritage Expert
(Fouder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
virasatheritage@gmail.com

ओडिसा : परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर




लोककला, संस्कृती, नृत्य, कापडावराची कलाकुसर यांनी ओळखला जाणारा, भारताच्या पूर्वेला आणि बंगाल उपसागराच्या किनारी वसलेला सुंदर प्रदेश म्हणजे ओरिसा! पण या प्रदेशाची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नक्कीच नाही. अगदी २२००-२३०० वर्षांपूर्वीचे कला, स्थापत्य आणि मूर्तींचे पुरावे आपल्याला या भागात सापडतात. मौर्य सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धात रक्तबंबाळ झालेला हा प्रदेश, इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून जैन आणि बौद्ध गुहांनी नटलेला हा प्रदेश आणि सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अत्यंत सुंदर आणि प्रचंड मोठी मंदिरे बांधली गेलेला हा प्रदेश.

ढोबळमानाने उत्तरेकडे असलेल्या मंदिरांना नागर प्रकारची मंदिरे म्हणतात. ओडीसा मधली मंदिरे नागर शैलीची म्हणता येतील, पण सुरवातीपासूनच तिथे एक प्रादेशिक शैलीचा विकास होत होता, आणि हि उपशैली “कलिंग शैली” म्हणून ओळखली जाऊ लागली. जसं जसं आपण एकेका मंदिराबद्दल जाणून घेऊ तेंव्हा या शैलीचा नीट विचार करू.
इसवीसनाच्या सातव्या शतकात बांधलं गेलेलं ओरिसा मधलं पहिलं  मंदिर – परशुरामेश्वर !

आपण मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या  (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.

या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी त्याच्याभोती आयताकृती भिंत बांधली आहे आणि अशी रचना ओरिसा मधल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते.

या मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली आहेत. जगमोहनात (मंडपात)  प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.

जैन, बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प आहे.
जगमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.

अष्टमातृका : अष्टमातृका किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही (ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.

परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.


 काही अभ्यासकांच्या मताप्रमाणे सोमवंशी घराण्यातील पहिल्या काही राजांपैकी एक म्हणजे ययाती (पहिला) त्याने हे मंदिर बांधले. ओरिसा मंदिर स्थापत्य आणि मुर्तीशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आणि तेवढेच सुंदर असे हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना एका मोठ्या तोरणातून प्रवेश करावा लागतो जे अखंड कोरीव काम केलेल्या दोन खांबांवर स्थिरावलेले आहे. या मंदिराच्या भोवती कोरीवकाम केलेला सरंक्षण कठडा बांधला आहे.
मुक्तेश्वर मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या जगमोहानात खांब नाहीत आणि आतून व बाहेरून या भिंती कोरीव कामाने सजवलेल्या आहेत.

वरच्या दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं आहे.
या मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश, शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.
मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.


Indraneel Bankapure

Indologist and Heritage Expert
(Founder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
heritagevirasat@gmail.com





वारसा स्थळे का बघावीत?


संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा, लिपी,साहित्य, कला, शिक्षण, तत्वज्ञान, राजकारण, व्यापार या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समाजाला आकार देत असतात. यात सगळ्यात महत्वाचा असतो तो आपला इतिहास. भविष्याची जडणघडण नीट होण्यासाठी भूतकाळाची माहिती असणे आवश्यक ठरते. 

जगात इजिप्शियन, रोमन, ई. सारख्या अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या. अनेक संस्कृती अशा आहेत ज्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या निव्वळ काही लेखी उल्लेख आलेत तिथे जाणवतात. पण हे सगळं आमचं आहे, हे आमच्या पूर्वजांनी केलंय असं म्हणणारे लोक आज तिथे भेटत नाहीत. 

भारतीय उपखंडात तयार झालेली, टिकलेली वैशिष्ट्य पूर्ण संस्कृती ही आमची आहे हे आज आपण अभिमानाने सांगतो. आपल्या घरी काढली जाणारी रांगोळी, साजरा केले जाणारे वेगवेगळे सण, घरी म्हणतो त्या आरत्या इथपासून ते गुहांमधली चित्रे, लेण्या, मंदिरे, विहार, संस्कृत - पाली साहित्य, दाक्षिणात्य साहित्य, कला, संगीत हे सगळं आपलं आहे, याची साक्ष देतात. आपल्यावर अनेक संकटं आली, परकीय आक्रमणे झाली, पण त्या सगळ्यांना आपलं करून, इथलेच एक बनवून संस्कृतीचा पाया घट्ट ठेवला. 


या अशा हजारो वर्षे आपली ओळख नं गमावता, आपल्या मुळांना नीट सांभाळून ठेवलेल्या संस्कृतीची माहिती आपल्या सगळ्यांना असणं ही आजची गरज आहे. जो पाया आपल्याला आज उभ्या असलेल्या समाजाला आधार देतो तो समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. 

आपल्या संकल्पना, तत्वज्ञान, साहित्य हे खूप काळ साठवून ठेवायचं असेल तर ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारतीय इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा, सुंदर आणि भन्नाट प्रयोग सुरू झाला.... भारतीय मंदिरे! 


अगदी छोट्या मंदिरापासून ते शेकडो फूट उंच कळस असलेल्या मंदिरांची निर्मिती केली गेली, एकाच पाषाणात प्रचंड मंदिरे कोरली गेली ज्याला मोनोलिथ म्हणतात, ईशान्य भारताच्या दऱ्याखोऱ्यात, हिमालाच्या कुशीत, समुद्राच्या किनाऱ्यावर आणि राजस्थान - गुजरात यांच्या वाळवंटात असे संपूर्ण भारतभर ह्या यशस्वी प्रयोगाची रचना झाली. भारताच्या बाहेर सुवर्ण द्वीसमूह म्हणजे आजचे इंडोनेशिया, बाली, सुमात्रा, कंबोडिया अशा देशांमध्ये आपल्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार झाला. 

भारतीय कलेच्या आधाराने भारतीय संस्कृती समजून घेण्याचा हा प्रयोग आहे. मंदिरे ही फक्त नमस्कार करण्यासाठी नसून ती ज्ञानाची केंद्र आहेत हे समजावून देण्याचा हा प्रयत्न आहे. 

धन्यवाद! 

इंद्रनील बंकापुरे
Indologist and Heritage Expert 
(Founder - Virasat - The Heritage Initiatives)
9960936474
virasatheritage@gmail.com